MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

राज्यात १७ मार्चपासून अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा


भारतीय हवामान खात्याने १७ ते २० मार्च दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले असून, काढणीला आलेला रब्बी हंगाम आणि साठवलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वातावरणातील या बदलामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहून आपल्या मालाची योग्य ती काळजी घेण्याचे सांगितले आहे.

समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हे संकट ओढवले असून पुढील चार दिवस राज्यातील हवामानावर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.


Post a Comment

0 Comments