नवी दिल्ली
केंद्र सरकारने देशातील इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या घरांमध्ये पीएनजी गॅस कनेक्शन उपलब्ध आहे, अशा ग्राहकांना आता घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर किंवा रिफिल घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना तातडीने त्यांचे एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकाच्या गॅस व्यवस्थेवर थेट परिणाम करणारा ठरणार आहे.

0 Comments